Iran Israel Conflict हवाई क्षेत्र बंद; पण भारतीयांना मायदेशी पाठवण्यासाठी इराणचा शब्द

Iran Israel Conflict Airspace closed; But Iran’s word to send Indians home : सबंध जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे असं सध्याचं चित्र आहे. इस्रायल आणि इराणमध्ये (Iran Israel Conflict) युद्धाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मध्य पूर्वेमधील तणाव चांगलाच वाढला आहे. (War) मात्र, याच दरम्यान आता इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मायदेशी परतण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण भारताने इराणकडे आपल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदत मागितली होती. त्यावर आता इराणचं सकारात्मक उत्तर आलं आहे.
इराणचं सकारात्मक उत्तर…
इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सुरू असल्याने इराणमध्ये (Iran Israel Conflict) अडलेल्या भारतीयांना मायदेशी परतायचे आहे. यासाठी भारत सरकारने इराणकडे या नागरिकांच्या सुखरूप सुटकेसाठी मागणी केली होती. त्यावर इराणकडून सांगण्यात आले आहे की, सध्या इराणमध्ये हवाई क्षेत्र बंद आहे. पण देशाच्या सीमा खुल्या आहेत. जेथून इराणमध्ये अडलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी पाठवले जाऊ शकते.
त्यासाठी सुविधा तयार केली जाईल. ज्यामध्ये इराणच्या (Iran Israel Conflict) परराष्ट्र मंत्रालयाकडून या भारतीयांची नावं, पासपोर्ट नंबर, वाहनाची माहिती, प्रवासाच्या तारखा आणि सीमा बिंदु यासारखी माहिती मागवण्यात आली आहे. तर मिडीया रिपोर्ट्सनुसार इराणच्या विविध शहरात हजारो भारतीय अडकलेले आहेत. ज्यामध्ये 1500 हून अधिक विद्यार्थी हे जम्मू-कश्मीरचे आहेत.
ऑपरेशन सिंदूननंतर पहिल्यादांच 5 ऑक्टोबरला भारत- पाकिस्तान भिडणार , ICC ची मोठी घोषणा
यातील विद्यार्थ्यांना (Iran Israel Conflict) सुरक्षित स्थळी ठेवण्याचं भारतीकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे भारत सरकारने गुगल फॉर्म जारी केला आहे. त्याची टेली ग्राम लिंकही देण्यात आली आहे. जेणे करून भारतीय नागरिक संपर्कात राहतील. तसेच नागरिकांना घाबरून जाऊ नये. अनावश्यक प्रवास टाळावा. तेथील अधिकाऱ्यांच्या सूचना पाळाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.